गुरुवार, फेब्रुवारी २३, २००६

यातायात

माझे office माझ्या घरापासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. बेंगलोरच्या मानाने ८ हा काही फार मोठा आकडा नाही. पण खरं सांगायचं तर बेंगलोरमध्ये अंतर हे वेळेत मोजतात, उदाहरणार्थ, माझे office माझ्या घरापासून सकाळी ७ वाजता १० मिनिटांवर असते, तर सकाळी ९ वाजता तेच office कमीत कमी अर्धा तास अंतरावर असते.

यामध्ये फार मोठा वाटा हा रहदारीचा आहे, रस्ता तोच, पण रहदारी दर पंधरा मिनिटांनी दुप्पट होत असते. असो, त्याबाबत माझी तक्रार नाही. या भागातली एकूण सगळी offices लक्षात घेतली तर ते अगदी साहजिकच आहे.

मुद्दा हा, की तेवढीच वाहनसंख्या दिली असताना, वेळ कमी कसा करायचा, जेणेकरून officeला पोहोचेपर्यंत इतका शीण येऊ नये की लगेचच परत घरी जावेसे वाटेल (अर्थात असे वाटले तरी परतीचा प्रवास सुखकर ठरणार नाही ही गोष्ट निराळीच).

माझी काही निरीक्षणे अशी आहेत -

signal वर वेळेचे counters देऊन बेंगलोर म.न.पा.ने खूप मोठी सोय करून दिलेली आहे; पण त्याचा फायदा चालक बिलकूल घेताना दिसत नाहीत. दिवा हिरवा झाला की मग पहिले वाहन signal पार करेपर्यंत पाच ते दहा सेकंद गेलेले असतात. संपूर्ण signal चा कालावधी जर अवघा ४५ सेकंद असेल, तर सरळसरळ १०-१५% वेळ यात वाया गेलेला आढळून येईल.

अजून एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पादचाऱ्यांचे वर्तन. वाहनांसाठी signal लाल असताना पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडला तर त्यास कोणी हरकत घेणार नाही. पण सगळ्यात जास्त "घाई" कोणाला असेल तर अशा बेशिस्त पादचाऱ्यांना. त्यांना वाटते थोडासा speed कमी करून मला जाऊ दिले तर या चालकाचे काय बिघडणार आहे? बरोबर आहे, रहदारी तुरळक असेल तर हे पूर्णतः बरोबर आहे. पण ४५ सेकंदाच्या तुटपुंज्या कालावधीत फक्त पाच पादचाऱ्यांनी प्रत्तेक हिरव्या खेपेला अशी अपेक्षा केली तर एकूण वाहतुकीच्या वेगावर फार मोठा परीणाम होणार आहे. आणि तो होतोच. शिवाय चालक वैतागतो. त्यातच मग कधीकधी clutch निसटतो आणि गाडी बंद पडते. अशा वेळी मागची वाहने horn वाजवून वाजवून त्यास/तीस मग बेजार करून टाकतात.

याचे मानसिक परीणाम पण होतात. पुढच्या वेळेस, मागच्या अनुभवाचा "बदला" घेतला जातो इत्यादी. हे सारे viscious circle आहे. कुठेतरी ते मोडले गेले पाहिजे.

साधी वाटणारी ही शिस्त जर अर्ध्या लोकांनी जरी पाळली तरी प्रवासाची ही यातायात कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

तुमची मते?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: