बुधवार, मार्च ३०, २००५

प्रत्येक दिवस हा एक मोठा अनुभव असतो. आपण कदाचित त्याकडॆ अशा द्रुष्टिकोनातून बघत नसू; पण हे सत्य आहे. पुस्तकाच्या हजार पानांचा डोंगर सर करताना जसे प्रत्येक पान महत्त्वाचे असते; पण शेवटी लक्षात राहते ते पूर्ण पुस्तक - त्यातली स्वतंत्र पाने नव्हेत. रोजच्या कामातसुद्धा एकेका दिवसाचे काम महत्त्वाचे असते; पण लक्षात राहतात ते फक्त milestones.

मनात येणाऱ्या विचारांचंही असंच काहिसं आहे. एखादा thread मनात घोटाळत असतो; परंतु असे अनेक धागे एकत्र जुळल्याशिवाय काहिही निर्माण होत नाही. एखादा धागा अवेळी तुटतो आणि इतर विचारांच्या गर्दीत बिचारा हरवून जातो. एखादी जलद धून अचानक जणू निसटून जावी, आणि मग प्रयत्न करूनही परत न आठवावी...

1 टिप्पणी:

अपर्णा म्हणाले...

chanach aahe ha wichar kiti diwas gholat hota aaj wachayal milala asa kahisa...:)