बंगलोरहून केरळात उतरताना बरीच जंगले लागतात. वायनाडचा घाट लागण्याआधी जंगलातून जाणा-या संस्मरणीय रस्त्यावर जागोजागी "इथे थांबू नका"च्या पाट्या आहेत. वाघोबा (आणि साथीला हत्ती) येऊन तुम्हाला उचलून पाहुणचारासाठी घेऊन जातील, अशा साधारण अर्थाची ती पाटी आहे. पण धीर करून आम्ही तिथे थांबलोच. थोडंसं जंगलात चालून गेलो तर ओढा (यास कवी निर्झर असे म्हणतात). आणि ओढ्याच्या कडेने सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वेडीवाकडी वाढलेली आंब्याची झाडे! एक-दोन कै-या पाडून दात आंबवण्यासारखे सुख नाही - तेही अशा घनदाट, किर्र-किर्र असं सतत पार्श्वसंगीत देणा-या रातकिड्यांच्या संगतीत.
हा जंगलातला रस्ता बांबूच्या झाडांतून कोरून काढला आहे की काय असे वाटावे इतकी बांबूची झाडे आहेत. आणि एकेक बेट म्हणजे शंभर-दोनशे बांबू! हळूच कुठे शीळ ऐकू येते की काय असा अंदाज घेतला, पण ऐकू काही आली नाही शीळ. इथे इतके बांबू आहेत की त्यांचा उद्योग केला तर नक्कीच बक्कळ पैका कमवू शकू. पण समजा, वादळात इ. खूप नुकसान झालं तर आली की दिवाळ्याची आफत. सुसाट वा-याने एखाद्या यशस्वी बांबुवंताची बांबूची बने अशी पार बसवली तर भयंकर नुकसान.. कदाचित यातूनच "बांबू बसला - बांबू बसला" असा वाक्प्रचार प्रचारात आला असावा!
असो!
रविवार, मे १३, २००७
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
२ टिप्पण्या:
बांबू बसला - बांबू बसला
:D
Nice photo
chan aahe sampurna pravas waran chapter....wachata wachata madhe madhe Pu. La. chi aathwan hot hoti...:)
टिप्पणी पोस्ट करा