तो बालपणिचा काळ मुख्यतः पाठ्यपुस्तकातल्या कवितांचा असल्यामुळे कवि आवडता होण्यामागची कारणेही थोडीशी 'पाठ्य' स्वरूपातलीच होती. आता पुन्हा त्या सगळ्या कविता वाचतो तेव्हा (आता उत्तरे लिहायची नसतात) तीच कविता आणखी वेगळी वाटायला लागते, प्रत्येक नवं वाचन त्या कवितेचं आणखी नवं रूप दाखवून जातं. त्याची मजा काही औरच. वेळ बदलते, संदर्भ बदलतात आणि तेच शब्द नवं काहितरी देऊन जातात. गद्य वाचनानंतरही असा अनुभव येतोच; पण पद्य वाचानानंतरचा नवा अनुभव अधिक परीणामकारक वाटतो.
बालकविंच्या कवितेबद्द्ल किती लिहावं!
"थबथबली ... ओथंबून खाली आली.
जलदाली ... दिसली सायंकाली."
केवळ सात शब्दांत आषाढ उभा करण्याचं सामर्थ्य आहे या शब्दांत.
"मधु मोती ... भूवर भरभर ओती" असं म्हणत, कवितेतला पाऊसच नव्हे तर प्रत्यक्ष कविताच अक्षरशः बरसते.
असं पावसाचं वर्णन असो वा नितांतसुंदर, लाज~या फुलराणीचं,
तो रविकर का गोजिरवाणा - आवडला अमुच्या राणींना?निसर्गसौंदऱ्याचं त्या निसर्गापेक्षाही सुंदर असं वर्णन वाचत रहावं; आणि पुनःपुनः वाचत रहावं.
लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी!
पायवाट पांढरी तयांतुनि आडवीतिडवी पडे;असे शब्द उच्चारले, की पाय टाकुनि जळात बसलेल्या औदुंबराकडे जायची हिरवी वाट हुबेहूब दिसायला लागते.
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे
गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी!काय हरवले? नव्हे, गवसले ते निव्वळ सोने!
काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी?
संध्याकाळ सरत आलेली, रात्रीच्या प्रवेशाचा समय झालेला, अशा वेळी,
आली होती भरती आता अस्तसमुद्रालाअशी संध्याकाळ फक्त बालकविंनाच दिसो जाणे. अशी कितीतरी हिरेमाणके बालकविंनी घडवून ठेवली आहेत. किती वेचावीत; आणि किती वेळा! माझी झोळी रिकामीच राहणार की काय असे वाटत राहते.
त्या लाटांतुन काय सांडल्या या मौक्तिकमाला!
कल्पतरुची फुले उडाली की वाऱ्यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुदबुद हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे?
विश्वशिरावर टोप चढविला हिऱ्यामाणकांचा!
मंगल, मंगल जिकडे तिकडे जय मांगल्याचा.
श्रावणमासी बद्दल मी आधीही लिहिलं होतं. वदनी अपुल्या वाचुन घ्यावे असे ते बालकविंचे श्रावण महिन्याचे अविस्मरणीय गीत.
'मधुयामिनी' ही कविता पुढे लिहून आजचं लिखाण पुरं करतो.
मधुयामिनी नील लता
हो गगनी कुसुमयुता
धवलीत करि पवनपथा
कौमुदि मधु मंगला
दिव्य शांती चंद्रकरी
आंदोलित नील सरी
गिरिगिरिवरी तरुतरुवरि
पसरी नव भू तिला -
सुप्रसन्न, पुण्य, शांत
रामण्यकभरित धौत
या मंगल मोहनात
विश्वगोल रंगला
'खेड्यातली रात्र' ही खुणावतेय, पण ती पुन्हा कधितरी...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा